गयाराम - आयाराम
गयारामकडे काम करणार्या शांताबाईने नोकरी सोडली. विनाकारणची कटकट आणि मध्यंतरी गयारामकडे सुरु असलेल्या आर्थिक अडचणींमुळे पगाराला उशीर होत असल्यामुळे शांताबाई कंटाळली होती. वर्षानुवर्षे काम करूनही पगारवाढ नाही की समाधान नाही, पाहुणे - रावणे आले जास्तीचंं काम पडलं तरीही कधी जास्तीचा ढेला हातावर पडला नाही. उलट चार -दोन पैसे गाठीशी असावेत म्हणून कुठे दुसरीकडे काम केलं तर त्यातही गयारामचा हिस्सा ठरलेला असायचा. ’माझ्याकडे काम करण्याच्या वेळातच तू दुसरं काम केलंं म्हणून त्यात माझा वाटा’, असं गयाराम तिला कामावर ठेवतानाच म्हणाला होता. एखादा खाडा केला तरीही खरकटी भांडी तश्शीच ठेऊन दुसर्या दिवशी जास्तीचं काम करावं लागत असल्यामुळे शांता तशी नाराजच होती. शांताबाई ही गयारामकडे तशी नोकरीवर असली तरीही तशी नोकरीवर नव्हतीच. म्हणजे तिला बरंच काही गयारामने दिलं होतं. घरातलं गोड - धोड, कपडे - लत्ते, मान - पान सगळं तिलाही मिळत होतं. तिलाच काय गयारामकडे असलेल्या सगळ्या गडी माणसांना हे सगळं भरपूर मिळत होतं. त्याच्याच भरवशावर या गडी - माणसांनी चांगल्या दोन - दोन मजली वाड्या बांधल्या होत्या. त्यांच्या - त्यांच्या वस्तीत त्यांंनी पत मिळविली होती. गयारामकडे कामाला म्हणजे मोठ्ठा माणूस, अशी ओळख त्यांची झाली होती. गयारामच्या पेढीवर लागायची तशी पण थोडी छोटी रांग या गड्यांच्या मांड्यांवरही लागलेली असायची. गयारामची ही गडी- माणसं सांभाळायची खास पद्धत होती. तो भरपूर मिठाई एका भांड्यात भरून ठेवत असे. येता - जाता एखाद्या नोकरानं मिठाई खाल्ली तरीही तो त्याकडे काणाडोळा करे. पण भांडच रिकामं होण्याची वेळ आली की बरोबर एखाद्या गड्याला पकडायचा, आणि त्याला शिक्षा करायचा. त्यामुळे त्याची नोकरांमध्ये जरबही होती आणि प्रत्येकजण थोडीच मिठाई खायचा. मग गयारामसाठी भरपूर मिठाई उरायची. पण...



0 Response to "गयाराम - आयाराम"
टिप्पणी पोस्ट करा